Tuesday, October 25, 2005

हुतात्मा

मराठी भाषेच्या बदलत्या काळाबरोबर गेल्या शतकापासून चालू असलेल्या युद्धात बळी गेलेल्या, हुतात्मा झालेल्या ‘शब्दांना’ माझे शतशः प्रणाम. काळाबरोबर नष्ट झालेल्या अनेक वस्तू, रूढींबरोबर त्यांची बिरुदं म्हणून मिरवणारे शब्दही अक्षरशः नामशेष झाले आहेत. त्यांचा उल्लेख आढळतो तो फक्त ऐंशी नव्वदीच्या घरातल्या आजी-आजोबांच्या तोंडीच.या ‘blog’ चा हेतू हाच की या २१ व्या शतकात त्याची कुठेतरी नोंद असावी.

काळ बदलला, माणसं बदलली, त्याची घरंही बदलली आणि अनेक शब्द बेघर झाले. ६४ खणी घरात राहिलेले लोक BHK चे मध्ये गेले आणि ‘खण’ कुठेतरी हरवले. ४ दारांसमोरच्या जागेत ‘अंगणाचा’ जीव गुदमरला. सिमेंटच्या फरशीवर ‘सडा’ पडेना झाला. माजघर, कोनाडे, खुंट्या, परसदार, वळचण, ओसरी... सगळं नाहीसं झालं.

नवीन नवीन सोयी झाल्या. चितळे पिशवीतनं दूध पोचतं करायला लागले आणि ‘चरव्या’ गेल्या. Mixer, grinders नी जाती, पाटे, वरवंटे यांना वाटेला लावलं. Electricity आल्यापासून दिवे ‘मालवायचे’ सोडून बंद व्हायला लागले.

हे काही शब्द संपले कारण त्यांची कारणंच संपली, पण काही काही शब्द तर replace झाले. आजकाल आम्हाला ‘पडसं’ नाही होत, ‘सर्दी’ होते. आम्ही ‘फाटक’ उघडं ठेवत नाही, ‘गेट’ बंद करतो. ‘तांबडं’ फुटत नाही: की ‘झुंजूमुंजू’ होत नाही, ‘दिन हुआ begin’ होतो. Flexi timing च्या जमान्यात ‘संध्याकाळ’ जिथे मिळत नाही तिथे ‘दिवेलागणी’ कुठली व्हायला... लहान मुलं आईच्या किंवा आजीच्या मांडीवर ‘निजत’ नाहीत, ती आपल्या स्वतंत्र खोल्यामध्ये ‘झोपतात’. ‘पातळाची’ आता ‘साडी’ झाली आहे आणि jeans सारखी तीही आजकाल ‘घालतात’, ती नेसत नाही कोणी. जी गोष्ट साडीची तीच फुलांची... आजी फुलं ‘माळायची’, नंतरच्या पिढीनं ती ‘घातली’….हल्ली तर त्याचीही लाज वाटायला लागली आहे. मुलींच्या कपाळाला पूर्वी ‘कुंकू’ असायचं, त्याला ‘टिकली’नं हरवलं.. पुढच्या पिढीत तर बहुधा तिलाही मान टाकावी लागणार. आजकाल पायात ‘वहाणा’ नसतात. Shoes, sandles किंवा floaters असतात. एखाद्या जुनाट व्यक्तीच्या पायात फार तर ‘चप्पल’ आढळते... तिला ‘पादत्राण’ अशी पदवी देवळात तेवढी मिळते...... तसे फारसे नाहीत पण थोडेफार ‘पक्षी’ दिसतात आजूबाजूला.. त्यांना ‘पाखरं’ म्हणून कोणी गोंजारत मात्र नाही.
जिथे आपण आज देश सोडतो आहे, रूढी सोडतो आहे, तिथे हे काही शब्द सुटले तर कुणाला काय फरक पडणार आहे... तरी पण राहून राहून वाटतं.... ज्या दिवशी जगातल्या शेवटच्या ‘आई’ची ‘मम्मी’ होईल, तो दिवस मायमराठीच्या सपशेल पराजयाचा असेल.

5 Comments:

Blogger Maitreyee said...

Asa kahitari fakta eka Punekar vyaktich lihu shakte :)

5:18 PM  
Blogger paamar said...

Nice one ! So there are still few ppl around who know how to use right words and shades in right context ! Looks like u have spent some time in 'vaaDa culture' or atleast read a lot abt it. In last week I read some articles in SakaL abt relaxing rules of 'shuddhalekhan'. Have u followed that thread ? Indeed thot provoking.

11:56 PM  
Anonymous Anonymous said...

atishay chhaan aahe...

aaplya bhashechi itaki laaj marathi sodun konalahi vatanar nahi

1:33 AM  
Blogger HK said...

Hey Harshad here, Wachun balpanichya athvani jagya jhalya, ajichi mandi athavli, angnat tya mandiwar doka theun goshti aikna athavla, ani tya goshti sangtanachi tichi "bhasha" hi athavli...great writing....didnt even have to look at your profile to know that you are a "assal punekar", mr.harshadkatikar@gmail.com

9:24 PM  
Blogger Unknown said...

Amruta
I don know who u r....but khup masta lihila ahes...u hav knack to pick exact words.....me swataha nostalgic prani ahe....n i love something like this....keep it up !!!!!

9:53 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home