Friday, March 17, 2006

Insecurity

काल “The Matrix” पाहण्यात आला. हे अशा प्रकारचे सिनेमे पाहिले की राहून राहून मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं. Hollywood मधल्या या अमेरिकन लोकांना सारखं असं का वाटत असतं की कोणीतरी त्यांच्यावर हल्ला करणार आहे? हल्ला करणारी वस्तू (हो वस्तूच म्हणलं पाहिजे) कधी परकी माणसं, कधी परग्रहवासी तर कधी मानवनिर्मित यंत्रं असतात. आणि मग कोणी हीरो महत्कष्टाने, पराक्रमाने पृथ्वीला (हो, प्रश्न सरळ पृथ्वीच्या किंवा अखिल मानव जातीच्याच अस्तित्वाचा असतो.) यातून वाचवतो. हे सिनेमे पाहून कुणाला वाटावं की विश्वाचा सगळा भार यांच्याच खांद्यांवर आहे.
ही झाली गोष्ट सिनेमाची. प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांची धारणा अशीच आहे असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. त्याशिवाय का ते इराक, इराण, अफगाणिस्तान बेचिराख करत सुटले आहेत? याच्या मुळाशी खरंतर काय आहे? खरंच का हे देश एवढे घातक आहेत? अण्वस्त्र त्यांनी बाळगली तर ती त्यांच्या संरक्षणासाठी आणि बाकी कोणी बाळगली तर ती जगात घातपात करण्यासाठी असं वाटण्याचं कारण काय? यामागे नक्की काय आहे? जग आपल्या काबूत ठेवायची महत्वाकांक्षा, खरंच जाणवलेला धोका? की असुरक्षिततेची प्रचंड भावना आणि ती लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न?

5 Comments:

Blogger Nandan said...

Hi amruta, long time no post.

2:23 AM  
Blogger Parag said...

matrix paahanyaat aala, ki "parat ekda" paahnyaat aala? :)

7:55 AM  
Blogger paamar said...

Hi amruta, long time no posts ?

6:40 AM  
Blogger Rasika Mahabal said...

Matrix is one of my favorite movies. It is based on a Hindu concept of 'Maya'. I think it is a wonderful movie and has a deep meaning to it.

6:44 PM  
Blogger paamar said...

Hey, Looks like this is an old post, but I happened to read it just now (came here from ur twitter page). btw, Matrix trilogy has some resemblance with 'Adwait' school of thought from vedic philosophy :) It is very interesting to know just in case you are interested.

12:35 AM  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home